Tuesday, 5 May 2020

सलाम त्या वीरपत्नीला शहिद पतीसाठी केला देशसेवेचा निर्धार ....


          महाराष्ट्र कन्या लेफ्टनंट स्वाती महाडिक...

   देशासाठी सदैव शीर तळहातावर घेणारा वीर सैनिक व त्याला तितक्याच प्राणपणाने साथ देणारी वीरपत्नी हे देशाचे भूषण आहेत. नियतीच्या आघाताने खचून जाणे , हे वीरपत्नीच्या स्वभावातच नसते. वीरगती प्राप्त झालेल्या कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक यांचा निर्धार उभ्या महाराष्ट्राला अभिमानास्पद आहे. वीरपतीचे निधन आयुष्यातील सर्वात दुःखद क्षण ; परंतु याच वेळी कर्नल महाडिक यांचे सैन्यात राहण्याचे अपूर्ण स्वप्न आपण सैन्यात भरती होऊन पूर्ण करायचं हा स्वाती महाडिक यांचा निर्धार, आपल्या दोन्ही मुलांनाही सैन्यातच पाठवण्याचा त्यांचा निर्णय आणि त्यांचा पूर्ततेसाठी खडतर प्रशिक्षणातून स्वतःला सिद्ध केलेल्या या विरंगणेचा हा परिचय तुम्हांला निश्चितच प्रेरक ठरेल. 
     
  महाराष्ट्र कन्या लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचा, 'भावुक वीरपत्नी ते सज्ज वीरांगना' असा प्रवास अत्यंत धाडसी , प्रेरक आणि थक्क करणारा आहे. 
।।स्वाती संतोष महाडिक।।
     शिवाजी विद्यापीठातून बी. एससी व एम. एस. डब्ल्यु अभ्यासक्रम पुर्ण केल्यानंतर पुणे महानगरपालिकेतील झोपडपट्टी पुनर्वसन विभागात दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठीच्या विविध योजना राबवण्याचे काम स्वाती महाडिक करत होत्या. शिक्षण पुर्ण झाल्यावर त्यांनी सुखी संसार करण्याची स्वप्ने पाहिली होती . दरम्यानच्या  काळात  त्यांचा विवाह भारतीय लष्करातील अधिकारी श्री. संतोष महाडिक यांच्याशी झाला. लग्नानंतर त्यांनी बी. एड आणि इतर अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केले. त्यानंतर आर्मी पब्लिक स्कूलमध्ये शिक्षिकेची नोकरी केली. साडेबारा वर्षांच्या सुखी संसारातील कार्तिकी व स्वराज ही त्यांची दोन अपत्ये.  कर्नल संतोष महाडीक यांचे पाहिले प्रेम म्हणजे 'भारतीय सैन्य दल आणि आपली वर्दी. '  याची जाणीव स्वाती महाडीक यांनाही होतीच. भारतीय सैन्यदलात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीचा व आगळ्या व्यक्तिमत्वाचा ठसा कर्नल संतोष महाडिक यांनी निर्माण केलेला होता. आणि अचानक...17 नोव्हेम्बर , 2015 रोजी जम्मू काश्मीरच्या कुपवाड्यात 49 राष्ट्रीय बटालीयनचे कर्नल संतोष महाडिक यांना दहशतवादी यांबरोबर निकराने लढा देताना वीरमरण आले. 
       नियतीच्या आघाताने खचून जाणे वीरपत्नीच्या स्वभावातच नसते. असीम धैर्य असलेल्या स्वाती महाडिक यांनी पतीच्या अंत्यविधीच्या वेळीच भारतीय सैन्यात रुजू होण्याचा निश्चय केला. वयाच्या  चाळीशीच्या आसपास असूनही वीरपत्नीने निश्चय पूर्तीचा ध्यास घेतला. त्यासाठी विशेष परवानगी घेऊन प्रयत्नपूर्वक वयाची अट शिथिल करून घेतली. स्टेट सिलेक्शन बोर्डाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन स्वाती महाडिक यांनी शारीरिक व वैद्यकीय चाचण्याही यशस्वीपणे पार पाडल्या. त्यातून त्यांची निवड ऑफिसर्स ट्रेनिंग अँकॅडमी , चेन्नई येथे झाली. तेथे त्यांनी अकरा महिन्यांचे अतिशय खडतर प्रशिक्षण पूर्ण केले आणि 9 सप्टेंबर 2017 रोजी लेफ्टनंट म्हणून लष्करात दाखल झाल्या. आपल्या खांद्यावर अभिमानाचे दोन स्टार मिळवले . त्या वेळी त्यांची मुलगी कार्तिकी ही सातवीत तर मुलगा स्वराज हा इयत्ता दुसरीत शिकत होता. या वीरपत्नीने देशासाठी पतीने केलेल्या बलिदानानंतर  खचून न जाता सैन्यदलात भरती होऊन केवळ आपल्या अपत्यांसमोरच नव्हे , तर देशातील प्रत्येक स्त्री , प्रत्येक मूल यांच्या समोर एक अनोखा आदर्श उभा केला आहे. त्याबद्द्ल त्यांचे आईवडील, सासरचे मंडळी व मुलांनाही त्यांचा सार्थ अभिमान वाटतो. "स्वाती लहानपासूनच धाडसी  होती",असे त्यांच्या आई सांगतात. पतीच्या मृत्यूनंतर समाजाने त्यांना शिक्षणक्षेत्रात तसेच राजकीय क्षेत्रात मानाच्या अनेक संधी , अनेक  सुखासीन आयुष्य देऊ केले होते ; परंतु ती सर्व प्रलोभने झुगारून त्यांनी सैण्यात भरती होऊन, पतीचे ' पाहिले प्रेम ' जिवंत ठेवण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्याचवेळी पित्याचे छत्र हरवलेल्या आपल्या  ' दोन्ही मुलांना सैन्यातच पाठवणार ! ' हा स्वतीताईंचा निर्धार हे देशप्रेमाचे, जिद्दीचे मूर्त रूप आहे.
       खडतर प्रशिक्षणाच्या काळात आपल्यापेक्षा साधारण निम्मे वय असलेल्या 22-23 वर्षाच्या तरुण मुलींबरोबर प्रशिक्षण घेताना स्वातीचा उत्साह सरत्या काळालाही लाजवणारा होता. हे प्रशिक्षण त्यांना खडतर वाटले नाही. उलट त्यांच्या दुःखावर मात करण्याचे ते एक साधन ठरले. अन्यथा या वेदनेतून बाहेर येने कठीण होते , असे  त्या म्हणतात .
       मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवणे स्वाती महाडिक यांना महत्वाचे वाटते , कारण त्यांच्या मते , एखादे मुक्कामाचे ठिकाण कधी येणार याचा विचार करतो तेव्हा ते अधिक खडतर वाटते . जेव्हा आपण त्या प्रवासाचा आनंद घेत मार्गक्रमण करतो तेव्हा तो प्रवास खडतर वाटत नाही. स्वाती महाडिक म्हणतात, "आर्मीचे जीवन ही फक्त नोकरी नाही, तर तो जीवन जगण्याचा एक वैशिष्ट्यपूर्ण मार्ग आहे". "तेथे शारीरिक क्षमतेपेक्षा मानसिक बल, आत्मबल अधिक महत्वाचे आहे". निग्रही, करारी आणि धाडसी अशा या रणरागिणीचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन महत्वाचा आहे.  
       आपण जे काम करतो, मग ते कोणतेही असो, त्याच्याबद्दल आणखीन जाणून घेणं , अधिक शिकणं हे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर महत्वाचे असते , असे त्या म्हणतात. पुरुषप्रधान संस्कृती असलेल्या भारतातील अनेक    मुलींना व स्त्रीयांना सैन्यदलात भरती होण्याची प्रेरणा देऊन वैभवशाली नव्या भारताचे स्वप्न त्या उभे करतात . 
      पतिनिधनाचे असीम दुःख बाजूला ठेवून पतीचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्याच्या हेतूने भारतमातेची सेवा करण्यासाठी सज्ज झालेल्या या वीरंगणेला सादर प्रणाम !  
       

Monday, 4 May 2020

AN INSPIRING WOMEN OF INDIA: ARUNIMA SINHA....!


  • पहली विकलांग महिला माऊंट एवरेस्ट फतह करने वाली अरुणिमा सिन्हा।                               
  • जिद्ध,चिकाटी,दुर्दम्य ,महत्वाकांक्षा,प्रयत्नवाद याचे मूर्तीवंत उदाहरण म्हणजे 'अरुणीमा ' ! अपघातामुळे अपंगत्व  आलेल्या अरुणीमाने आयुष्यात हार तर मानली नाहीच उलट ध्येयाचे उंच शिखर गाठण्यासाठी ती सज्ज झाली . 'एव्हरेस्ट गाठणे' हे भल्याभल्यांचे स्वप्न असतात; पण सकारात्मक दृष्टीने अरुणीमाने हे स्वप्न सत्यात उतरवले . अरुणीमाला स्वतावर आलेल्या संकटात गमवाव्या लागणाऱ्या पायांसाठी सहानुभूतीची अपेक्षा करतांना दिसत नाही , तर प्रतिकूल परिस्तितीवर मात करुन ध्येय गाठण्याचा आदर्श आपल्यासमोर ठेवते , किंबहुना आपल्या प्रत्येकात एक 'जिद्दी अरुणिमा' असते 
Arunima sinha
   ।।तुमच्यातल्या अरूनीमाचा शोध घ्या ।। 

ध्येय साध्य करताना आलेली निष्पळता म्हणजे अपयश नव्हे तर कमकुवत ध्येय म्हणजे अपयश, हे कायम लक्षात ठेवा असे अरुणिमा सांगते .
 अरुणिमा सिन्हा!  आज तुम्ही गूगलवर शोधले तर  'Mount Everest सर करणारी पहिली अपंग भारतीय महिला असा उल्लेख जिचा  दिसतो तीच ही अरुणिमा'.
  पण खर तर ती काही जन्मताच अपंग वैगरे नव्हती . तीची  धडधाकट असल्या पासूनची गोष्ट बघा ।
  लखनऊपासून 200 किमी अंतरावर असणार आंबेडकर नगर हे तीच गाव . घरी ती , तिची आई आणि तिचा लहान भाऊ . मोठ्या बहिणीच लग्न झालेलं . तिचे वडील ती लहान असतानाच देवाघरी गेलेत. आता भाईसाब( मोठ्या बहिणीचे पती ) हेच काय ते त्यांच्या कुटुंबातले महत्वाचे निर्णय घेणारे . खेळांवर अतोनात प्रेम करणाऱ्या कुटुंबात ती जन्मली हे तिचे अहोभाग्य; पण फुटबॉल आणि व्हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियनशिप मिळाल्यावर 'आता CISF  ची नोकरी मिळते का बघ , म्हणजे खेळाशी जोडलेली राहशील', हा भाईसाहबनी दिलेला सल्ला तिने शिरोधार्य मानला त्यानुसार नोकरीसाठी अर्ज केला नि 'कॉल लेटर' आले देखील; पण फॉर्ममध्ये नेमकी तिची जन्मतारीखच चुकलेली होती . हा घोळ निस्तारण्यासाठी तीला दिल्लीला जाणे भाग होते.

11एप्रिल , 2011चा तो दिवस. लखनऊ स्टेशन गर्दीने फुललेल .पद्मावती एक्सप्रेस मध्ये कसेबसे चढत गर्दीतून मुसंडी मारत शिताफीने तीने कॉर्नर सीट पटकावले . गाडीने वेग घेतला आणि तिचे विचारचक्र सुरू झाले . 'बस....एवढे कागदपत्रांणचे काम  झाले, की झालेच आपले पक्के असा विचार अरुणिमा करत होती' . अचानक तिचे लक्ष वेधून घेतले ते तिला घेरून उभ्या असणाऱ्या तरुणांनी . त्यांचे लक्ष तिच्या गळ्यातल्या सोन्याच्या चेनवर होते ; पण तीही काही कच्च्या गुरुची चेली नव्हती त्यांनी डाव साधण्याचा प्रयत्न करताच जेवढी होती नव्हती तेवढी ताकद एकवटून तिने  तिच्याजवळ येणाऱ्या प्रत्येकाला लाथाबुक्क्यांचा प्रसाद द्यायला सुरुवात केली . आशःचर्य म्हणजे , त्या डब्यातील प्रत्येकजण ' अन्यायाविरुद्ध लढणे हे जणू पाप आहे ' , अश्या चेहऱ्याने मख्खपणे  जागेवरच बसून राहिला . अखेर चोरांच्या सहनशक्तीचा अंत झाला . रात्रीच्या भयाण अंधारात तिचे दोन्ही हातपाय धरून त्या नराधमांनी तिला चक्क चालत्या गाडीतुन बाहेर फेकून दिल . शेजारून जाणाऱ्या एका भरधाव रेल्वेवर ती आढळली आणि तिच्या वेगामुळे आणखी जोरात दोन धावपट्ट्यांच्या मध्ये उडून ती खाली पडली . 'अरुणिमा , रेल्वे येतेय आणि तुझे पाय बाजूला घे ', हा तिच्या अंतर्मनाचा संदेश मेंदूपर्यंत पोहचेपर्यंत खुप उशीर झाला होता. त्याआधीच एक रेल्वे तिच्या पायांवरून धडधडत निघून गेली . नंतर महिला आयोगाने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार , तब्बल 49 गाड्या त्या रात्री तिच्या पायावरून गेल्या.... एका पायाच्या गुढग्यापासून खालच्या हाडांचा तर चक्काचूर झालाच होता ; पण दुसऱ्या पायाचीही दूरवस्था झालेली .  


   त्या रात्री तब्बल सात तास , रेल्वेच्या धावोपट्टीवर मदतीची याचना करत अरुणिमा पडून राहिली . आश्चर्य म्हणजे तिची शुद्ध हरपली नव्हती आणि मेंदू पूर्ण तल्लखपणे तिथून सुटकेचा विचार करत होता...सगळीकडे उजाडलं आणि रेल्वेचे सफाई कामगार तेथे आले . हादरलेच ते तिला तश्या आवस्तेत पाहून . त्यांनी तिला बरेली गावातील हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि सुरू झाले दुर्दैवाचे दशावतर .

   बरेलीच्या त्या हॉस्पिटलमध्ये ना भुलतज्ञ होता ना तिला देण्यासाठी पुरेसे रक्त. संचित झालेले डॉक्टर व सहकाऱ्यांना तिनेच धीर दिला , 'डॉक्टर , नाहीतरी माझ्या पायाची चाळण झालेलीच आहे आता भूल न देताच तुम्ही तो कापलात तरी चालेल अशी जखमी अरुणिमा बोलली .' मग डॉक्टरांनी तिच्यादेखतच  तिचा पाय कापला .

   पण हॉस्पिटलबाहेरच्या जगात एक वेगळेच नाट्य घडत होते . 'फुटबॉल आणि हॉलीबॉल चॅम्पियन युवती सात तास जखमी अवस्थेत उपचाराविना पडून राहिली 'ही बातमी प्रसारमाध्यमांनी उचलून धरलेली . तत्कालीन क्रीडामंत्र्यांनी तिला दिल्लीच्या 'एम्स'मध्ये हलवले, राष्ट्रीय खेळाडू असल्या क्रीडामंत्र्यांनी तिला दिल्लीच्या 'एम्स'मध्ये हलवले, राष्ट्रीय खेळाडू असल्याने अत्युच्च दर्जाच्या सुविधा तिला मिळाल्या ...पण...पण शल्य एकच होत की प्रसारमाध्यमांमध्ये वाटेल त्या वावड्या उठत होत्या. 'अरुणिमकडे  प्रवासाचं तिकीट नव्हतं म्हणून तिने रेल्वेतुन खाली उडी मारली ' इथपासून ते'अरुणिमाने आत्महत्तेचा प्रयत्न केला ',इथपर्यंत काहीही छापून येत होत. तब्बल चार  महिने 'एम्स'मध्ये राहिल्यानंतर, शारीरिक जखमांवर मलमपट्टी झाली होती ; पण या मानसिक जखमांचे घाव अंतरंग घायाळ करणारे होते . ती आणि तिचं ढालीप्रमाण रक्षण करणार  कुटुंब सत्य परिस्थिती ओरडुन सांगत होते ;पण  ती एकण्यासाठी ना कुणाला वेळ होता ना रस.
            त्याच दिवशी , हॉस्पिटलमध्ये पडल्या पडल्या   मी निर्धार केला , 'जे आज बोलत आहेत , माझ्याकडे बोट दाखवत आहेत त्यांना बोलु दे ; पण एक दिवस नक्की माझा असेल , जेव्हा ही आरुणिमा एव्हरेस्ट सर करेल !' आरुणिमा म्हणते आपला सर्वांत मोठा मोटिव्हेटर कोण असतो ?  तो दुसरा तिसरा कोणी नसून आपण स्वतःच असतो. आता उठता - बसता , खाता - पिता केवळ आणि केवळ ती एव्हरेस्टचाच विचार करू लागले होते.
            पहिला टप्पा होता गिर्यारोहण प्रशिक्षणाचा. 'एम्स'मधून  डिस्चार्ज मिळाला. साधारणपणे एखादा हात/पाय  कापावा लागलेले पेशंट्स दिवसेंदिवस अगदी महिनोन महिने उठत नाहीत . ती दोनच दिवसात उभी राहिली. एका  पायात घोटःयाची हाडे तुटल्याने रॉड घातलेला , ज्यांच्या हाडांची जुळणी अजून पुरी व्हायची होती. दुसरा पाय म्हणजे मांडीपासून खाली कृत्रिम पाय बसवलेला . असा तिचा अवतार नि जोडीला भाईसाब पोचले  ते थेट बचेंद्री पाल यांच्याकडे . बाचेंद्रीजी म्हणजे एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला . त्याच एकमेव अशा होत्या, की ज्यांनी तिला ध्येयाचा आदर दिला , तीला प्रोत्साहन दिलं. त्या म्हणाल्या, "अरुणिमा,तू अशा परिस्थितीत इतका मोठा निर्णय घेतलास....तुला ठाऊक आहे , तुझ्या आतलं एव्हरेस्ट तू केव्हाच सर केलं आहेस. आता तुका एव्हरेस्ट सर करायचं आहे ते फक्त स्वतःला सिद्ध करायला , जगाला तू कोण आहेस हे दाखवून द्यायला....!"
            तिच्या अशा अवस्थेमुळे प्रथम तिच्यासोबत तिचा शेरपा जायला तयारच होईना . साहजिक आहे , जिथे अव्यंग , धडधाकट माणसे गिरिभ्रमण करण्यास धजत नाहीत तिथे तिची काय कथा ? पण तिच्या घरच्या लोकांनी तिच्या शेरपाचे मन वळवले आणि मग तिथून पुढे सुरू झाली क्षणोक्षणी आव्हानांना भिडणारी जोशपूर्ण अशी 52 दिवसांची एक रोमांचकारी लढाई!'
            प्रत्येक गिर्यारोहकाला शिखरापर्यंत पोहोचण्याआधी चार बेसकॅम्प्स करावे लागतात. एकदा का तुम्ही 'कॅम्प चार ' ला पोहोचलात ,की तिथून शिखर 3500 फुटांवर आहे; पण जास्तीत जास्त मृत्यू याच टप्प्यात होतात म्हणून याला 'डेथ झोन ' म्हटले जाते . मला तुम्हांला सांगावंस वाटत,की चौथ्या बेसकॅम्पला पोहोचेपर्यंतही आधीच्या कॅम्पसमध्ये ती तिच्या सहकारी गिर्यारोहकांमध्ये नेहमीच पुढे असे. इतकी पुढे की लोक विचारत , 'मँडम, हर बार आप हमसे आगे रहते हो! आखीर खाते क्या हो भई?' ती अपंग म्हणून कसल्याही प्रकारची सवलत किंवा सहानुभूती नको होती तिला....कदाचित याच विचारांच प्रतिबिंब तीच्या कृतीतून उमटत होतं...

            'डेथ झोन'ची चढाई सुरू झाली ...जिकडे तिकडे मृत्यूदेहांचाच खच पडलेला , तिला आदल्या रात्री भेटलेला बांगलादेशी गिर्यारोहक मृत्युमुखी पडलेला दिसला...पोटातून उसळून वर येणाऱ्या भीतीला ती आवर घालत होती.'तुला मरायचं नाहीये,अरुणिमा ',अंतर्मनाला वारंवार ती हेच बजावत होती. ती सांगते , आपलं मन जसं सांगत , तसंच, अगदी तसच आपलं शरीर वागत.
            21मे, 2013 ला चढाईचा अगदी शेवटचा टप्पा आला . 'अरुणिमा,तुझा ऑक्सिजनचा साठा अतिशय कमी झालाय,आत्ताच मागे फिर...एव्हरेस्ट तू पुन्हा चढू शकशील!' शेरपा कळकळीने बजावत होता ; पण अंतर्मनात कुठेतरी तीला ठाऊक होतं की Now or never ! आता अगदी या क्षणी जर तिने एव्हरेस्ट सर केलं नाही , तर तिच्या लेखी तिच्या शरीराने मृत्यूला कवटाळन्यासारखेच होते ना .  शिवाय, पुन्हा एकदा इतकी सगळी स्पॉन्सरशिप उभी करणं या अग्निदिव्याला तोंड द्यावं लागलंच असतं. अखेर ती एव्हरेस्ट शिखरावर पोहोचली...

Monday, 20 April 2020

The Most Inspired Person Of India - Dr. A. P. J Abdul Kalam, डॉ.ए. पी. जे अब्दुल कलाम



        The Most Inspired Person Of India - Dr. A.P.J Abdul Kalam    
डॉ.ए. पी. जे अब्दुल कलाम
" जर तुम्हाला सुर्यासारखं चमकायचं असेल तर आधी तुम्हाला सुर्यासारखं जळावं लागेल..."

ए.पी.जे अब्दुल कलाम भारताचे ११ वे राष्ट्रपती होते. त्यांचा जन्म तामिनाडूमधील रामेश्वरम् येथे झाला होता.ते एक एरोनॉटिकल अभियांत्रिक(इंजिनिअर) होते. त्यांनी डी.आर डी.ओ. मध्ये कार्य केले व भारताच्या अग्नी-१, अग्नी-२ आणि अग्नी-३ प्रक्षेपण अस्रा निर्मिती केली. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ते इस्रोचे वैैज्ञानिक होते.
भारतरत्न, भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती. अवुल पाकिर जेनुलब्दिन अब्दुल कलाम भारताचे ११ वे राष्ट्रपती होते.

कार्यकाळ :- 
जुलै २५, इ.स. २००२ – २५ जुलै २००७पंतप्रधानअटल बिहारी वाजपेयीउपराष्ट्रपतीहमीद अन्सारीपुढीलप्रतिभा पाटीलराष्ट्रीयत्वभारतीयराजकीय पक्षअपक्षव्यवसाय वैज्ञानिक, एरोनॉटिकल इंजिनिअर.

शिक्षणसंपादना :-
अब्दुल कलाम यांचे वडील रामेश्वरमला येणाऱ्या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्या-आणण्याचा व्यवसाय करीत. मुलाच्या काॅलेजप्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. त्या काॅलेजातून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.
त्यानंतर अब्दुल कलाम यांचा १९५८ ते ६३ या काळात संरक्षण संशोधन व विकास संस्थेशी (DRDO) संबंध आला.

कार्य :-
१९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील पीएसएलव्ही (सॅटेलाईट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले.इंदिरा गांधीपंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असे व सहकाऱ्यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टॅंक) रणगाडा व लाइट कॉंबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.
विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्यविभूषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्‍न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ. कलाम हे अविवाहित व पूर्ण शाकाहारी होते. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते. पुढील वीस वर्षांत होणाऱ्या विकसित भारताचे स्वप्न ते सतत पाहत असत.
अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्म दिवस जगभरात जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून पाळला जातो.
भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्मविभूषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्‍न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला.

अब्दुल कलामांना मिळालेले पुरस्कार व सन्मानसंपादन करा
१९८१ : पद्मभूषण
१९९० : पद्मविभूषण
१९९७ : भारतरत्‍न
१९९७ : इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार
१९९८ : वीर सावरकर पुरस्कार
२००० : रामानुजन पुरस्कार
२००७ : किंग्ज चार्ल्स (दुसरा) पदक
२००७ : ब्रिटन येथील वॉल्व्हरहॅम्प्टन विद्यापीठाची डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी
२००८ : सिंगापूर येथे डॉक्टर ऑफ इंजिनिअरिंग ही मानद पदवी
२००९ : अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्सचे हूव्हर पदक
२०१० : वॉटर्लू विद्यापीठाची डॉक्ट ऑफिंजिनिअरिंग ही मानद पदवी
२०११ : न्य़ूयॉर्कच्या आयईईई या संस्थेचे सभासदत्व
२०१५ सप्टेंबर : बंगालच्या उपसागरात ओरिसाच्याकिनाऱ्याजवळ असलेल्या व्हीलर आयलंडचे प्रचलित नाव बदलून ते अब्दुल कलाम बेट असे करण्यात आले.

आइए आज  जाणते है  डॉ. अब्दुल कलाम के महान विचारोंको जिनके दम पर उन्होने सफलता के महान बुलंद खडे किये...

इंंसान को कठीनाइयों की आवश्यकता होती है,
क्योकि सफलता का आनंद उठाणे के लिये ये जरुरी है ।



  •  जब हम कठीनाइयो का सामना करते है तो हम

     अपने भीतर छिपे साहस के असिमीत भांडार                  को खोज पाते है।।
             
  •   महान सपने देखने वालों के
       महान सपने हमेशा पुरें होते है।।




  •  आप अपना भविष्य नहीं बदल सकते पर आप

       अपनी आदते बदल सकते है...
       और निश्चित रूप से आपकी आदते आपका भविष्य          बदल देगी।।


   नीचे दिये गए डॉ अब्दुल कलाम के चार सिद्धांतो का पालन करके कुछ भी हासील किया जा सकता है।
   
1) महान लक्ष्य बनाना।

2) ज्ञान अर्जित करना ।

3) कडी़ मेहनत करना ।

4) दृढ रहना ।।

Tuesday, 14 April 2020

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

           भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार - 
      डॉ.बाबासाहेब आंबेडकर         
                                                                     
    " शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा..."
 भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तसेच स्वतंत्र भारताचे  पहिले  न्यायमंत्री डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म  मध्यप्रदेशातील इंदौर जिल्ह्यातील महू या गावी 14 एप्रिल 1899  रोजी झाला .  
भिमराव रामजी आंबेडकर हे त्यांचे पूर्ण नाव होते. बालपणापासूनच वडिलांनी भिमरावांना चांगली पुस्तके वाचण्याचा छंद लावला.
व्यायामाने जसे शरीर घडते तसे वाचनाने मस्तक सुधारते हे भिमरावांच्या  अंगी रामजींनी पुरेपूर उतरवले. त्यांचे ग्रंथ वाचनाचे वेड अजब होते. ते ग्रंथालयात ग्रंथ वाचण्यासाठी सर्वात  अगोदर जात व सर्वात शेवटी बाहेर पडत.

"शिक्षण हे समाज परिवर्तनाचे उत्तम माध्यम आहे"
हे डॉ . बाबासाहेबांनी मनोमन ओळखून समाजाला नवदिशा दिली. लहानपणापासून भिमराव अत्यंत हुशार विद्यार्थी होते.त्याकाळी अस्पृश्यतेचे विषारी पीक समजतात आपली मुळे घट्ट रोवून डौलाने डोलत होते . त्यास मुळापासून उखडून टाकण्याचा पक्का निर्धार करून डॉ बाबासाहेबांनी  संघर्ष करण्याचे ठरवले...
 त्यांनी  जनतेला आवाहन केले . शिका, संघटित व्हा संघर्ष करा हा मोलाचा संदेश त्यांनी समाज बांधवांना दिला. स्त्रीयांच्या, गोरगरिबांच्या जीवनात चैतन्याची  नवी पहाट आणण्याचे डॉ बाबासाहेबांनी ठरवले. 
त्यांनी मॅट्रिक , बीए , एमए ,  पीएचडी अशा अनेक  पदव्या घेत डी. लिट. पदवी संपादन केली .
अनेक भाषांवर त्यांनी उत्तम प्रभुत्व मिळवले.
डॉ .बाबासाहेबांची भाषा चिंतनशील, अभ्यासपूर्ण गहन होती. डॉ .बाबासाहेब आंबेडकर परिस्तिथीने श्रीमंत नसले तरी त्यांच्या विचारांनी मात्र ते गर्भ श्रीमंत होते . अनेक पाक्षिके , ग्रंथ , वृत्तपत्र यांचे प्रभावी संपादान करून समाज्याच्या प्रश्नांना त्यांनी प्रखर वाचा फोडली.
भारत देशाला उत्तम राज्यघटना प्रदान करण्याचे अजोड  कार्य बाबासाहेबांनी केले.
डॉ. बाबासाहेबांचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू होते.
त्यांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह करून समग्रविश्वासाठी तळे खुले केले. जनतेची तहान भागवण्याचे महान, मोलाचे कार्य बाबासाहेबांनी केले.
   अश्या या महामानवाने ६ डिसेंबर १९५६ रोजी अखेरचा श्वास घेतला. आजच्या प्रत्तेक विद्यार्थ्याने जनतेचे  कैवारी डॉ .बाबासाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन शिक्षण घेतले तर नक्कीच भारताचा भावी नागरीक उत्कृष्ट,प्रेरक,आदर्श ठरेल यात शंकाच नाही.


जगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका .
 या जगात काहीतरी करून दाखवायचे आहे.
 अशी महत्वकांक्षा सदैव तुमच्याकडे असली पाहिजे...

"

 लक्षात ठेवा जे संघर्ष करतात तेच यशस्वी होतात 
            ।। डॉ. बाबासाहेब आंबेडकर ।।

Tuesday, 7 April 2020

The Most Inspiring Person Of India - Prime Minister Shri Narendra Damodhardas Modi भारताचे प्रेरणादायी पंतप्रधान - माननीय श्री. नरेंद्र दामोधरदास मोदी

The Most Inspiring Person Of India - Prime Minister
Shri Narendra Damodardhas Modi...

भारताचे प्रेरणादायी पंतप्रधान - माननीय श्री. नरेंद्र दामोदरदास मोदी
" नमो मातृभूमी जेथे जन्मलो मी
नमो आर्यभूमी जिथे वाढलो मी
नमो कर्मभूमी जिथे त्याच कामी
पडो देह माझा नमामी नमामी "
  •  माझा पण देह याच मातीत पडला पाहिजे , ज्या मातीत ज्ञानोबांनी वारकरी संप्रदयाचा पाया रचला आणि तुकोबा त्याचा कळस झाले. ज्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो त्याच मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजे  जन्माला आलेत आणि त्याच मातीमध्ये  आपले भारताचे  पंतप्रधान नरेंद्र मोदी जन्माला आलेत ही आपल्यासाठी दुर्लभाचीच गोष्ट आहे.
  • भारतभूमी म्हणजे ही संतांची आणि महापुरुषांची भूमी आहे,म्हणून म्हणावसं वाटत दुर्लभम भारत जन्म. 
  • नरेंद्र दामोदरदास मोदी यांचा जन्म : १७ सप्टेंबर १९५० रोजी झाला. 
  • हे भारतीय जनता पक्षाचे (भाजपचे) नेते आणि मे २६ इ.स. २०१४ पासून स्वतंत्र भारताचे १५ वे पंतप्रधान आहेत. 
  • ते ऑक्टोबर ७ इ.स. २००१ पासून मे २२ इ.स. २०१४ पर्यंत गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते. 
  • भाजपाच्या गुजरात विधानसभेच्या २००२ ते २०१२ च्या तसेच १९९५च्या व १९९८च्या निवडणूक विजयांमध्ये मोदींचे मोठे योगदान होते. ते २००१ च्या ऑक्टोबर मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री झाले व त्यानंतर सरळ ४ विधानसभा जिंकत मोदींनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार पाहिला. 
  • २००९ लोकसभा निवडणुकीसाठीही ते भाजपचे कूटनीतिज्ञ होते.
  • मोदी हे हिंदुत्ववादी विचारसरणीचे नेते आहेत व संघाचे स्वयंसेवक आहेत.
ला तर बघूया त्यांचे विचार...
  • भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी बाहेर अंगणात खेळत असताना त्याठिकाणी एक कचरेवाला तेथे कचरा साफ करायला येतो तर नरेंद्र मोदी  आईला घरात आवाज देऊन म्हणतात मांं मां कचरेवाला आया है, तर त्यांची आई घरातून त्यांना मनते, बाळ ते कचऱ्यावाले नाहीत कचऱ्यावाले तर आपण आहोत   ते सफाईवाले आहेत.
  • म्हणजेच एक विचार माणसाचे आयुष्य बदलून टाकत आयुष्य बदलल तर जीवन बदलत , जीवन बदलल तर रास्ता बदलतो आणि रास्ता बदलला तर सगळं जग बदलत.

माननीय मोदीजींनी त्यांच्या व्याख्यानांत म्हटले आहे,
  • काही लोकांना याचीच भीती वाटते की, मी काही केले आणि त्यात मला अपयश आले तर.
त्यावर मोदीजींनी किती छान म्हंटलय बघा,
  • तुम्ही देशभरात असा कोणी व्यक्ती बघितलाय का, जो अपयशी झाल्याशिवाय कामयाब झाला आहे. 
  • कधी कधी तर यशाचा रास्ताच  अपयश दाखवतो म्हणूनच अपयशाला घाबरुन जाणे याला काय जगण म्हणतात का ? 
  •  जो नदीच्या किनाऱ्यावर उभा राहतो तो कधीच पाण्यात बुडत नाही .आणि जो पाण्यात जाऊन बघतो तो पाण्यातही डुबतो आणि पोहायलाही शिकतो.
  •  आपण किती गरीब आहोत किंवा किती श्रीमंत आहोत याला काहीही महत्व नाही फक्त एकच गोष्ट जरुरी आहे ती म्हणजे आपला आपल्या स्वतावर विश्वास ! 
  •  मनाने श्रीमंत व्हा संपत्तीने नाही.
  • मोदीजी म्हणतात माझ्या स्वतःच्या परिवारात राजनीतीचा 'र' पण कोणाला माहिती नव्हता आणि माझी घरची परिस्तिथी पण खुप नाजूक होती. तुम्हाला सर्वांना तर माहितीच असेल मी स्वतः लहान असताना रेल्वेच्या डब्यात चहा विकत होतो आणि आज मी भारताचा पंतप्रधान आहे
  • आत्तापन आपल्या भारत भूमीवर खूप मोठे संकट आले आहे त्या संकटाचा सामना कसा करायचा हे मोदीजी वारंवार आपल्याला सांगतच आहेत।। 

कोरोना से भारत को बचाने के लिए पीएम मोदींनी हात जोडें।              
                      देश से कही 
                      मन की बात...
घरा बाहेर जाणे काय आहे हे थोड्या दिवस विसरून जा...
                     घरातच रहा
                     घरातच रहा आणि 
                     एकच काम करा 
                     आपल्या आपल्या घरातच रहा....
कोरोनाला थांबवायचं असेल तर एकच पर्याय आहे, आपआपल्या घरातच राहणे .
  • हमारी परंपरा , हमारा विश्वास , हमारी विचारधारा इन सभी पर हमला बोला है। इसलीये हमें अपनी आस्था , हमारी पंथ , हमारी विचारधारा को बचाने के लिए सबसे पहले कोरोना विषाणू के उपर अर्ज करना पडेगा।
  • आज काळाची मोठी  गरज आहे की सर्व जात , धर्म आणि विचारांचे लोक एकत्र येऊन कोरोना महामारीला हरवले पाहिजे..

 चला तर साथ देऊया, आणि कोरोना वर मात करूया आणि माननीय पंतप्रधानांना मदत करूया कोरोना मुक्त भारत करण्यासाठी.....
                       " भारत माता की जय...."

Saturday, 4 April 2020

Chatrapati Shivaji Maharaj Mhanje Kay ??? छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय..????


What is Mean By Chatrapati Shivaji Maharaj???

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय ???🤔🤔🤔


प्रतिपश्चंद्रलेखेव  वर्धिष्णुर्विश्ववंदिता
शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते "

" ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो, आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो, तशीच शहाजींचा पुत्र शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा लौकिक वाढत जाईल..."
  " प्रतीपदेच्या चंद्रकले प्रमाणे वाढत जाणारी आणि संपूर्ण विश्वाला वंदनीय असणारी , शहाजीराजे आणि जिजाऊंचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा लोककल्याणासाठीच आहे...."

   " विजेसारखी तलवार चालवून गेला , 
निधड्या छातेने हिंदुस्तान हलवून गेला, 
वाघ नखाने अफजल खाणाचा कोथळा  फाडून गेला ,
 मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो शैतानांना नडून गेला, 
अरे स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकून मुजरा केला असा मर्द मावळा शिवबा होऊन गेला,
 शिवबा होऊन गेला..."
   
" ताजमहाल अगर प्यार की निशाणी है, तो 19 फरवरी मेरे शेर की कहाणी है।।।"
 
      शिव, शिवबा, शिवराय, छत्रपती  शिवाजी महाराज म्हणजे काय ???
 " रे विझणाऱ्या पणतीलाही फडफडायला लावणारी आग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज 
 आगीतून निघणाऱ्या ज्वाला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज,
तुटणाऱ्या तारीतुन निघणाऱ्या सुरांची राग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज,
भरकटणाऱ्या वासराला गोठ्यात आणणारी माय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज , 
दुधाची नव्हे तर दह्याची बनणारी साय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ..."

 अरे भूगोल  जरी जगाचा असेल तरी इतिहास हा फक्त माझ्या राजांचा आहे ....

                     शिव म्हणजे काय....???
   
शिव म्हणजे श्वास, शिव म्हणजे ध्यास, शिव म्हणजे अभ्यास,
शिव म्हणजे विश्वास, शिव म्हणजे आत्मविश्वास,
शिव म्हणजे मान, शिव म्हणजे सन्मान, शिव म्हणजे आत्मसन्मान, शिव म्हणजे स्वाभिमान, शिव म्हणजे अभिमान, शिव म्हणजे प्रतिष्ठा, शिव म्हणजे पराकाष्टा, 
शिव म्हणजे तन, शिव म्हणजे मन, शिव म्हणजे धन, 
शिव म्हणजे आग, शिव म्हणजे राग , शिव म्हणजे त्याग, 
शिव म्हणजे दान, शिव म्हणजे बलिदान, 
शिव म्हणजे शक्ती, शिव म्हणजे भक्ती, शिव म्हणजे युक्ती,
शिव म्हणजे आत्मा, शिव म्हणजे परमात्मा, 
शिव म्हणजे द सुपर मॅन,
शिव म्हणजे ध्यान, शिव म्हणजे माता, शिव म्हणजे ज्ञाता,
शिव म्हणजे विधाता, शिव म्हणजे कावा, शिव म्हणजे छावा
शिव नम्रता, शिव म्हणजे संस्कृती, शिव म्हणजे संस्कृतीप्रेम,
शिव म्हणजे ना जात, ना पात फक्त आणि फक्त धर्म 
शिव म्हणजे धेय्य, शिव म्हणजे स्वप्नं आणि प्रचंड तेज , प्रचंड ध्यास आणि अखंड श्वास  म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज।। 

शि-शिस्तप्रिय, शिवाचा अवतार
वा-वाणिज्य तेज, वाऱ्यासारखी झुंज देणारा 
जी-जिजाऊंचे पुत्र, जाणता राजा म्हणजेच राजा शिव छत्रपती

 ६२ किलोची तलवार वागवतो त्याच नाव धनाजी
 जो राजांबरोबर एकटा खिंड लढवतो त्याच नाव बाजी
 हात तुटला तरी लढत राहतो त्याच नाव तान्हाजी
 आठ तासांत दिल्लीहून पुण्याला घोडा आणतो त्याच नाव संताजी
 दिड तासांमध्ये दुष्मणाला पळत सोडतो त्याच नाव तान्हाजी
 वाघाचा जबडा टराटरा फाडतो त्याच नाव संभाजी आणि
ह्या सगळ्यांना एकत्र घेऊन  स्वराज्य स्थापन करतो त्यांच नाव छत्रपती शिवाजी महाराज

।। जय जिजाऊ, जय शिवराय ।।
" शिवराय मनामनात, शिवजयंती घरा घरात"




सलाम त्या वीरपत्नीला शहिद पतीसाठी केला देशसेवेचा निर्धार ....

          महाराष्ट्र कन्या लेफ्टनंट स्वाती महाडिक...    देशासाठी सदैव शीर तळहातावर घेणारा वीर सैनिक व त्याला तितक्याच प्राणपणाने साथ दे...